राज्यात आज कोरोनाची एकुण रुग्ण संख्या ही ३६,२६५ झाली असून आज एकट्या मुंबईत नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही २०,००० च्या वर गेली असून यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. तर आज ८,०००च्या वर कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

त्याच बरोबर राज्यात ओमायक्रोन चे ७९  ऍक्टिव्ह रुग्ण असून यातील निम्याहून अधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९६.१७ % इतके वाढले आहे. 

जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे मास्क वापरणं अनिवार्य आहे, प्रत्येकाने आपआप ली काळजी घ्यावी. 

कोरोना रुग्णवाढीची संख्या कमी करण्यासाठी गर्दी टाळणे खूप महत्त्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य आहे.

Post a Comment